Wednesday 2 June 2021

मुंबईचे अत्यावश्यक पतन

 This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

सदर लेख ऑर्कूटवर 20१३  साली लिहिला होता.. जुना ब्लॉग गूगळ ने डिलिटला.. हा लेख मित्राने सेव्ह करून ठेवला होता, त्याच्या उपकाराने पब्लिश करत आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
सेना-भाजप मध्ये जी सुंदोपसुंदी सुरु आहे असे मराठी-मिडिया भासवायचा प्रयत्न करतोय, हे त्यांच्या अज्ञानाचे द्योतक आहे. मुळात त्यांना हे अजून कळत नाही (कि वळत नाही) कि मोदी आणि अमित शाह हे दोघे खेळाचा नियम ठरवणार आणि त्यांनी ठरवलेल्या नियमांवरच ते त्यांचा खेळ खेळणार. त्यांनी कुठल्या नियमांनी खेळायचे हे मराठी-मिडिया, त्यांचा बोलविता-धनी म्हणजे दोन्ही-कॉंग्रेस आणि सेनेतले अतिउत्साही (भाजपात देखील आहेत) लोक ठरवणार नाहीत.

हिंदुत्वाच्या भल्यासाठी मुंबई चे पूर्ण पतन अत्यावश्यक आहे. ते लवकरच होणार हि श्रींची इच्छा आहे. मुंबई (आणि थोडेफार पुणे) केंद्रित शक्ती-स्थाने आपटणार, यामुळे..  मोदींची कसोटी यात असणार आहे कि ते मुंबई चे पतन पूर्णपणे आणि "कंट्रोल" मध्ये होऊ देतात कि लगाम सुटतो. जर त्यांनी मुंबई चे कंट्रोल्ड डीमोलीशन केले तर एक अभूतपूर्व राजकारणी या विशेषणावर त्यांचे पूर्ण स्वामित्व होईल.. या पतनात सेना आपली भूमिका चोख वठवीत आहे.

काही गोष्टी काळाच्या गर्भात अस्फुट आहेत तर असू द्याव्यात. पण थोडीबहुत gist अशी -

काबुल ते इंडोनेशिया या ड्रग-रूट वर मुंबई सर्वात महत्वाचा बिंदू आहे. मुंबई हि मुंबई बनली ती बेसिकली तस्करीच्या सोयीसाठी (ब्रिटीश काळापासून). मुंबई ची मूळ-वास्तू हि literally "gateway of India" या अर्थाने आहे. ती भारताची बाहेर बघायला असलेली खिडकी नाही. ते बाहेरच्यांचे भारतात घुसायला असलेले दार आहे.

भारतातली कुठलीही शक्ती या ड्रग-रूट मधल्या प्रस्थापित खेळाडूंशी पंगा घेऊ शकत नाही. टाटा, गोदरेज, वाडिया वगैरे लोक देखील याच अफूच्या व्यापारात १८५७ च्या सुमारास उतरून "मोठे" झाले. त्यांनी जी गुंतवणूक तेव्हा पासून केली आहे (बरी-वाईट) ती गुंतवणूक काही "बांधील्क्या" निर्माण करते. हि नवे फक्त उदाहरण दाखल आहेत.

आणीबाणी आणि सोवियत रशियाच्या अफगाणिस्थान स्वारीच्या काही वर्षे अगोदर पासून मुंबई मध्ये या अफू-लॉबीने जोरदार प्रवेश केला. त्यात आपले "जाणते राजे" आणि त्यांचे गुटखेवाले मित्र हे हिरीरीने सामील झाले. त्यामुळे - मुंबईची जी अत्यंत फास्ट ग्रोथ (थोडी बरी बव्हंशी वाईट) १९८० नंतर झाली त्यात बहुतेक पैसा याच लॉबीचा आहे.

रियल-इस्टेट, बॉलीवूड, शेयर-मार्केट - हे तीनही सेक्टर याच मध्यपूर्व स्थित लॉबीवर पूर्णतः अवलंबून आहे. हे कायदेशीर रित्या सिद्ध आता होऊ शकत नाही, त्यामुळे सरकारी SIT या पैश्याला हात लाऊ शकत नाही. पण १९८० नंतर मुंबईत असलेली जवळपास प्रत्येक मोठी गोष्ट हि घाण-पैसा आधारित आहे. वास्तविक "काळा-पैसा" हि टर्म इथे चुकीचे आहे, कारण कर-चुकवलेला पैसा हा काळा असतो. काळा पैसा काही वाईट नसतो. काळा-पैसा सरकार कडे नाही आला तरी देशात फिरत राहतो आणि जीडीपी ला भर देत राहतो.

हा जो घाणपैसा मी म्हणतो आहे तो मुंबई मध्ये या लॉबीने गुंतवला आहे आणि मन्नू-चिदंबरम च्या participatory notes मुळे जोरात भारतात आला आहे - पण FII च्या रुपात.

कॉंग्रेस ने सगळ्यात मोठा घोटाळा केलाय तो बँक मध्ये - जाणकार दबक्या आवाजात हे बोलून राहिले. SBI सारखी बँक आणि LIC सारखी संस्था डबघाई ला आलेली आहे. जर SBI कोसळली तर करोडो लोकांचे सेविंग जाणार. ती बँक डबघाई ला का आली? चुकीची कर्जे देण्यास त्यांना मजबूर करण्यात आले. आता त्यातली बहुतेक कर्जे "बुडीत" आहेत म्हणतात.

या सर्व झोल चा केंद्रबिंदू मुंबई आहे. हा डोलारा पडणे आवश्यक आहे. आणि एक खूप मोठे recession भारताकडे येत आहे - हे मी दोन वर्षे ओरडतोय. मोदी हे महाभारतातल्या घटोत्कचासारखे आहेत - इंद्राची अमोघ-शक्ती स्वतःवर घेऊन ते पडतील, जेणेकरून अर्जुन वाचेल - तो अर्जुन कोण? ते माहिती नाही.

जेव्हा आणि जर मार्केट मध्ये panic पसरेल, तेव्हा आणि तर मुंबई मध्ये शेयर-बाजार, बॉलीवूड आणि रियल-इस्टेट हे तीन सेक्टर बसतील - म्हणजेच यांशी संबंधित सगळे बसतील.

यात नगरसेवक आले, मनपा-अधिकारी, पोलीस, राज्य-सरकार, केंद्र-सरकार, मध्यपूर्वेतले मोठे ब्रोकर, अफू-लॉबी मध्ये लोक सगळे आले).. मुंबई मध्ये टिकून राहणे हा शिवसेनेचा खूप खूप मोठा पराक्रम आहे. पण तो एक खूप मोठी किंमत चुकवून केलेला आहे. तसाच जसा आणीबाणी च्या सुमारास इंदिरागंधी च्या vengeance पासुन स्वतःला (आणि पश्चिम महाराष्ट्राला) वाचवण्यात शरद पवारांचा खूप मोठा पराक्रम आहे. पण तो गाजवायला त्यांनी सैतानाची मदत घेतली.. या सर्व कर्माचे फळ आज न उद्या भोगावे लागणारच. त्याचीच चिन्हे आता दिसून राहिलीत.. म्हणून वरची कमेंट.

या सर्वांच्या नाकाखाली टिचून हिंदू-मुलींचा मध्यपूर्वेत वेश्या-म्हणून पाठवायचा मोठा व्यापार मुंबई मधून चालतो - हे सर्वांना माहिती आहे, पण कुणी काही बोली शकत नाही (या व्यापारात १८५० मध्ये आताचे काही प्रथितयश घराणे देखील होते ).

हे सगळे enforce करायला युपी-बिहार-बंगाल मधले मुसलमान (आणि काही प्रमाणात हिंदू) गुंड असतात. त्यांना मुली सप्लाय कराव्या लागतात. एकूण काय तर एक खूप मोठी  कुजलेली ecosystem आहे मुंबई.

हिंदुत्वाचे पूर्ण प्राकट्य व्हायला हिंदू (पक्षी> हिंदुत्वनिष्ठ) लोकांकडे भांडवलाची "ownership" आणि कंट्रोल हवा जो १७९० ते १८५७ या कालावधीत आपण गमावला. आपण गमावला कारण या कालावधीत पश्चिम-किनारपट्टी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जोरदार आपटली.. मराठे पतित झाले आणि दोन खूप मोठे दुष्काळ लगातार येऊन त्यांनी या भागाची पूर्ण वाताहत केली. त्यामुळे या लॉबीला (ज्यांचे नेतृत्व तेव्हा आणि आज देखील इंग्रज करतात) पाय रोवायची संधी मिळाली.

मुंबई हि एक नोड आहे. या सर्व प्रकारचे केंद्र हे सेन्ट्रल-लंडन आहे. आजही त्या भागाला "द सिटी" म्हणतात. तो वेगळा आणि रंजक इतिहास आहे. तो पुन्हा कधीतरी.

रबिन्द्रनाथ ठाकूर यांच्या शब्दात , " हे स्वर्गातल्या पित्या, भारतावर भीषण आणि निर्दय प्रहार कर, जेणेकरून तो स्वातंत्र्यरुपी स्वर्गात जागा होईल"..

जर मुंबईचे कंट्रोल्ड पतन मोदी करू शकले (लोकांचे सेविंग ला फारसा धक्का न देता) तर त्यांना मी तरी अवतारी पुरुष म्हणेन. कॉंग्रेस ने (बव्हंशी त्यांच्या नाईलाजाने) एक खूप मोठा टाईम-बॉम्ब लावून ठेवला आहे. तो फुटणार हे निश्चित - कधी आणि किती कंट्रोल्ड स्वरुपात - हे ठरायचे आहे.