Sunday 21 May 2017

नरसंहार - हिटलर, युरोपीय युद्धे आणि उपखंडातली परिस्थिती.

युरोपीय युद्ध अटळ होते. जर्मनी ने फक्त सुरुवात केली, इतकेच.. युद्धात ढकलले वगैरे बोलणे फोल आहे. १८७० पासून युरोप आणि जग एका मोठ्या युद्धाकडे येत होते. फार कशाला, अगदी शेरलॉक होम्स लिहिणारा आर्थर कॉनन डॉयल याने देखील आपल्या राय्खेनबाख फॉल्स या कादंबरीत हे निरीक्षण नोंदवलेले आहे. ते युद्ध पहिल्या आणि दुसर्या युद्धाच्या रुपात झाले १९९३ पर्यंत (युगोस्लाविया विघटन) चालू राहिले. १८८० पासूनची ती साखळी १९९३ मध्ये संपली आणि युरोप शांत झाला. हिटलर च्या युद्धाचा आता तरी निष्पक्ष विचार झाला पाहिजे. हिटलर असता, अगर नसता, युद्ध अटल होते. दुसरे युद्ध हे जर्मनी-रशिया मधला अनिर्णीत सामना होता जो रशियन क्रांतीमुळे १९१७ मध्ये अपूर्ण राहिला होता. इंग्रज-फ्रेंच-अमेरिका वगैरे सगळे बाजूला बसून गंमत पाहत होते आणि सुरुवातीला तर जर्मनीला समर्थन करीत होते. त्यामुळे त्या क्लिष्ट आणि रंजक इतिहासाला इतके सिम्प्लीफाय करू नका. आणि त्या simplified इतिहासाचा वापर इथली तुमची राजकीय उणीदुणी काढायला करू नका, हि विनंती. 

अगदी तसेच युद्ध गेले ६० वर्षे आशिया मध्ये हळूहळू  बिल्ड होत आहे. भारत, सुन्नी-मुसलमान आणि चीन हे तीन कोण आहेत या संघर्षाचे. या त्रिकोणी संघर्षाला तोंड फुटणे आणि त्यात कोट्यावधी लोकांचा जीव जाणे हे अटळ भविष्य आहे. हे जर कुणी बघू शकत असेल तर दुसर्या-युद्धातल्या हिटलरच्या भूमिकेची जाणीव होईल. जर हे हळूहळू बिल्ड-होत असलेले युद्ध लोकांना दिसत नसेल तर आपले तेच होईल. आणि हे भारतात आणि आसपास जवळ येणारे युद्ध लोकांना बिलकुल दिसत नाहीये हे भारतीय लोकांच्या राजकीय आकलनावरून हे स्पष्ट होते. दोन युरोपीय युद्धांना जर महायुद्ध म्हणत असू तर उपखंडात आणि आशियात बिल्ड होणार्या युद्धास जेव्हा तोंड फुटेल त्यास काय म्हणतील, याची काळजी वाटते. 

राहता राहिली बात नरसंहाराची, तर त्याच्याहून अधिक खून इंग्रज आणि स्टालिन यांनी केले आहेत. निव्वळ भारतात १८५७ च्या नंतर कलकत्ता ते कानपूर पर्यंत गंगेच्या दोन्ही तटांवर १० किलोमीटर पर्यंत निर्मनुष्य पट्टा इंग्रजांनी तयार केला होता. इथे अंदाजे ८५ लाख लोकांना मारले होते, आणि गावे च्या गावे जिवंत जाळली होती. त्यामुळे बॉडी-कौंट हा निकष धरला तर इंग्रज आणि स्टालिन हिटलर हून खूप पुढे येतात. इंग्रजांनी  भारतात वेळोवेळी घडवून आणलेले दुष्काळ यात धरले तर हीच संख्या ७-८ कोटी पर्यंत जाते. अगदी १९४३ मध्ये इंग्रजांनी बंगाल मध्ये दुष्काळ इंजिनियर केला नि ३० लाख लोकांना मारले. त्यामुळे शिव्या सिलेक्टिव्ह नसाव्यात. पाकिस्तानी सेनेने ३०-४० लाख बंगाली हिंदूंना असेच मारले. खुद्द बांगलादेशी लोक तिथल्या हिंदूंना असेच संपवत आहेत. तुर्कस्तान ने आर्मेनिया मध्ये हेच केले. इंग्रजांनी झुलुंच्या नरसंहारात खूप लोकांना मारले (त्यात गांधीजी इंग्रजांच्या बाजूनी होते). कंबोडिया मध्ये पोल-पॉटने देखील असेच घडवले, आणि चीन ने तिबेट मध्ये हेच चालवले आहे. भारतात कम्युनिस्ट पक्षांनी बंगाल च्या अनेक जिल्ह्यांमध्ये हेच चालवले आहे.

हिटलरच्या नरसंहाराचे समर्थन कुणीच करू देखील शकत नाही इतके ते अमानुष होते. पण १८५७ नंतर इंग्रजांनी उचललेल्या पाऊलांचे समर्थन करणारे लोक सत्तेत आहेत आणि इतरत्र सुद्धा, ते निष्कलंक सुटतात. 

नरसंहार हा रास्त मार्ग आहे - असे मानणारे घटक सर्वत्र आढळतात. त्यांना समाजमान्यता देखील बऱ्याच ठिकाणी मिळते. विशेषतः त्या समाजात जिथे एक देव-एक पुस्तक-एक प्रेषित वगैरे थेरं चालतात. फक्त धार्मिक नाही, हिटलर आणि कम्युनिझम देखील यात आले. पण यांच्या हून मोठा नरसंहार हा इंग्रजांसारख्या "दुकानदार" राष्ट्राने केला आहे - तो निव्वळ नफ्याकरता. 


हे सगळे आसपास घडत असताना, गाफील राहणे नि "आम्ही पण हे करू शकतो" अशी विश्वासार्ह-धमकी देऊ न शकणारे राष्ट्र आणि समाज एकतर स्वायत्तता गमावतो किंवा नष्ट होतो.  हि धमकी देता येणे आणि गरज पडल्यास ती खरी करून दाखवता येणे हि खरी ट्रिक आहे. ती जर जमली तर कमीतकमी बळी "घेऊन" मुद्दा सिद्ध करता येतो आणि शांती आणि स्वायत्तता अबाधित राखता येते. नाहीतर पुढे ते मोठ्या प्रमाणावर करावेच लागते. 

No comments:

Post a Comment