Sunday 21 May 2017

सार्वभौमत्व आणि गुप्तचर्य

सध्या जगात थोडेफार "सार्वभौम" म्हणता येतील असे फक्त ६-७ शक्ती आहेत... या देखील संपूर्णपणे "सार्वभौम" नाहीत.. सूची सार्वभौमत्वाची उतरती यादी आहे)

१. नाटो (यात सर्व पाश्चात्य देश आले - अमेरिका, कानेडा, पश्चिमी युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू-झीलंड, दक्षिण कोरिया, जपान, तैवान, सिंगापूर, थोड्याफार प्रमाणात इस्राईल आणि दक्षिणपूर्व आशिया) - याची दोरी सी-आय-ए च्या हातात आहे.
२. चीन (पी.एल.ए - पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांचे मिलिटरी इंटेलिजन्स)
३. रशिया (पूर्वीचे केजीबी आताचे एफ.एस.बी) आणि इस्राईल
४. इराण
५. पाकिस्तान (मनो या न मानो)
६. भारत
७. ब्राझील

इस्राईल दोन ठिकाणी टाकता येईल. मोसाद वगैरे तसे पहिले तर अमेरिकेच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही. इस्राईल हा तगून आहे कारण इस.१२०० नंतर पूर्वेचा खुष्कीचा मार्ग १९२० मध्ये उघडला. तुर्कांनी जेरुसलेम आणि १४०० मध्ये इस्तंबुल जिंकल्यावर पूर्वेचा दरवाजा पश्चिमेसाठी बंद झाला तो १९२३ मध्ये उघडला. ८०० वर्षे झालेला कोंडमारा पश्चिम विसरलेली नाही. तो महत्प्रयासाने उघडलेला दरवाजा आणि सुएझ कालव्यावरचा ताबा हाती राहावा म्हणून इस्राईल १९४८ मध्ये बनवले. १९२०-४८ तो भाग इंग्रजांची वसाहत होता. 

म्हणून इस्राईल च्या बहुतेक नीती अमेरिकेला अनुसरून असतात. बऱ्याच वेळेस इस्राईल स्वतंत्र नीती राबवते आणि अमेरिकेस ऐकण्यास भाग पाडते कारण ज्यू लोकांच्या ताब्यात मोठमोठ्या बँक आहेत (बार्कले, जे.पी.मॉर्गन, लेहमन ब्रदर्स, रॉकफेलर, रॉथचाईल्ड, गोल्डमन साक्स, एच.एस.बी.सी, इतर बरेच. खुद्द इस्ट इंडिया कंपनी मध्ये रॉथचाईल्ड घराण्याचा मोठा सहभाग होता, असो). म्हणून इस्राईल दोन ठिकाणी आहे. अर्थात हि यादी माझी आहे. माझ्या माहितीवर आणि कल्पनाशक्तीवर आधारित आहे. त्यामुळे यावर किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

युरोप मधील सर्व देश आणि शक्ती १९९० नंतर पूर्णपणे अमेरिकेच्या कह्यात आहेत. अर्थात अमेरिका हि इंग्लंड ची उत्तराधिकारी आहे (१९४१ पासून). एम.आय.६ ला एफ.बी.आय चे अधिकारी पाठवून सी.आय.ए सुरु करण्यात आली. उत्सुक लोकांनी "द गुड शेफर्ड" हा रोबर्ट दिनिरो चा चित्रपट बघावा. हा इतिहास थोडाफार समजेल. 

भारताची "आय.बी" हि इंग्रजांच्या एम.आय.५ वर आधारित आहे, तर १९६८ मधली रॉ थोडीफार सी.आय.ए  सारखी बनवली आहे. यात केजीबी चा देखील मोठा सहभाग होता. बांगलादेश चे युद्ध हा सी.आय.ए आणि केजीबी यांच्यातील जगभर चालणाऱ्या युद्धाचा एक भाग होता. 

सार्वभौमपणे भारताने घेतलेले निर्णय तसे विरळा आहेत. १९७४ ची अणुचाचणी, १९९८ ची अणुचाचणी, सियाचीन १९८४, ऑपरेशन पराक्रम, २००१, श्रीलंकेतले आयपीकेएफ १९८७, ऑपरेशन ब्रासटाक १९८६ (हे मोसाद सोबत केलेले एक ऑपरेशन होते असे म्हणतात जे आय.एस.आय ने अमेरिकेच्या सहाय्याने हाणून पाडले.) तीच गोष्ट २००१ च्या ऑपरेशन पराक्रम ची जे देखील अमेरिकेने हाणून पाडले. बाकी बहुतेक गोष्टी भारताकरवी "करविल्या" गेल्या आहेत (अगदी १९७१ चे युद्ध सुद्धा).. अर्थात सगळेच म्यानेज केलेले नसते, थोडीफार फ्रीडम असतेच, ती कशी फायद्याची करायचे हे त्या वेळेसच्या नेतृत्वाच्या कर्तुत्वावर ठरते. म्हणून ७१च्या इंदिरा गांधी, सबंध नरसिंह राव आणि जून २००२ पर्यंतचे वाजपेयी हे उत्कृष्ट पंतप्रधान अनुक्रमे ठरतात. 

आय.एस.आय चा रेकॉर्ड रॉ आणि आय.बी पेक्षा खरंच चांगला आहे. याला कारण त्यांना भारतात एजंट सहज मिळतात. प्रत्येक अशी एजन्सी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या "background" विषयी सजग असते. रॉ मध्ये, आयबी मध्ये वरिष्ठ पातळीवर विशिष्ट प्रदेशातले "हिंदू" असतात असे दिसते. हे आयबी पेक्षा रॉ मध्ये जास्त आढळते. सीआयए मध्ये आंग्लवंशीय प्रोटेस्टंट गोरे असतात, मेक्सिकन आणि गोरे काथोलिक देखील घेत नाहीत. चीन मध्ये हान वंशीय मध्य चीन मधले लोक असतात. पाकिस्तानात ग्रांड-ट्रंक रोड (लाहोर ते पिंडी) या भागातले पंजाबी बरेलवी पंथाचे लोक वरिष्ठ पदावर असत (आता बदलत आहे, म्हणून प्रॉब्लेम सुरु झाला आहे). 

तर योग्य पार्श्वभूमी आणि योग्य त्या माणसाची शिफारस नसेल तर सहसा वरच्या पदावर जाता येत नाही, विशेषतः या फिल्ड मध्ये. हे थोडे जुने संदर्भ आहेत. आता गोष्टी बदलू लागल्या आहेत आणि हे घडणारे बदल आता समाजात देखील दिसत आहेत. डोळे उघडे ठेऊन बघणे आवश्यक आहे. 

पाकिस्तान हा भारत केंद्रित आहे. पण भारतास शत्रू तीन प्रकारचे आहेत (तीन ग्लोबल फोर्स). कमीअधिक प्रमाणात या तीनही शक्तींशी भारत युद्धरत आहे. या तीन शक्तींचे आधुनिक (१९४५ नंतरचे स्वरूप) सीआयए, केजीबी आणि आयएसआय होते. १९९० नंतर केजीबीची जागा चीन ने घेतली आहे. या चौकोनाच्या तीन कोनांशी वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या संदर्भात शत्रुत्व आणि मैत्री आणि न्युट्रल असणे ही तीनही रीस्पोंस भारत दाखवत आला आहे. हे तीन कोण देखील भारताविषयी असेच रीस्पोंस दाखवत राहतात.

हे तीन शत्रू यासाठी आहे कारण भारताला अजून "स्वत्व" सापडलेले नाही. "भारतीय" असणे म्हणजे काय हो भाऊ? हा भारतीय या सिनेमातला प्रश्न खूप बोचरा आणि खरा आहे. माझ्या मते भारतीय असणे म्हणजे धार्मिक संस्कृतीचा असणे. या संस्कृतीच्या रक्षणासाठी वाटेल ते करणे हे भारतीय गणराज्याचे एकमेव कर्तव्य असले पाहिजे, असे मला वाटते. यालाच मिडिया वाले हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात..  पण नेहरूप्रणीत व्यवस्थेला हे पटत नाही. म्हणून, पुलं म्हणतात तसे भारताची परराष्ट्रीय नीती "होय होय, नाही नाही" अशी नेहमी असते. 

एक प्रश्न - उत्तर भारतात झालेला विजेचा मोठा झोल यात चीन मधून आणून लावलेले transponder bugged होते म्हणून झाला नसेल कशावरून

ऑपरेशन पराक्रम सुरु असताना गोध्रा मध्ये ट्रेन कशी जाळली आणि त्याच्या ३ आठवडे पूर्वी धमकी मुशर्रफ ने कशी काय दिली? यांवर विचार केला कि कोण किती पाण्यात हे कळते. यावरून त्यांचे इथले पेनेट्रेशन आणि आपले तिथले पेनेट्रेशन किती याची कल्पना येते आणि कोण अधिक "सार्वभौम" या प्रश्नाचे उत्तर देखील मिळते. 

ऋग्वेदात असलेल्या या श्लोकाने (जो आपण रोज आरती नंतर अर्थ न समजता म्हणतो, तो लिहून मी हा लेख संपवतो). उत्सुकांनी गुगल करून याचा अर्थ शोधावा..

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं 
समंतपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति 
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो 
मरूतस्यावसन् गृहे ।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

No comments:

Post a Comment